नातेसंबंध संजीवनी:
आपले नातेसंबंध चांगले आणि आनंददायी असावेत असे आपल्या सर्वांनाच वाटतं. परंतु जेव्हा एखादा नातेसंबंध तणावात जातो, बिघडतो अथवा चीघळतो, तेव्हा तो नातेसंबंध सुधारण्यासाठी:
सुरुवात कोणी करावी?
त्याचा पाठपुरावा कोणी करावा?
त्यामध्ये माघार कोणी घ्यावी?
त्यामध्ये धन्यवादभाव कोणी ठेवावा?
माफी कोणी मागावी?
कौतुक व शाबासकीची थाप कोणी द्यावी?
त्यामध्ये माफी कोणी करावी?
त्यामध्ये प्रेम कोणी ओतावे?
सद्भाव आणि संयम कोणी ठेवावा?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जर आपण “समोरच्या व्यक्तीने” अशी दिली तर अशी नाती आयुष्यभर रखडलेलीच राहतात. म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरं “आपण स्वतः” अशी द्यावीत आणि रखडलेल्या या नात्यांना संजीवनी द्यावी.