मुलांना माहिती देताना:
आपल्याला पालक म्हणून आपल्या मुलांना यथायोग्य माहिती देण्यास आवडते. अशी उपयुक्त माहिती देऊन आपण मुलांना कायम वापरण्यासाठी एखादी भेटच देत असतो. आयुष्यभर त्याला ती माहिती असणे आवश्यक व फायदेशीर ठरते. उदा. “दूध फ्रिजमध्ये ठेवले नाही तर नासते,” “खुली जखम स्वच्छ ठेवली तर लवकर भरून येते,” “बिस्किटे उघडी राहील्यास मऊ पडतात,” उघड्यावरचे अन्न खाल्ल्यास पोट बिघडते,”इत्यादी.
मुलांना अशा प्रकारची माहिती देणे टाळावे जी त्यांना आधीच माहित आहे. मुलांच्या वयानुसार योग्य ती माहिती योग्य त्या प्रसंगी दिलेली चांगले. अन्यथा आपल्याला मूर्खात काढले जात आहे किंवा आपला उपहास व चेष्टा-मस्करी करून अपमान केला जात आहे, असे मुलांना वाटणे शक्य आहे.
मुलांना यथायोग्य व प्रसंगानुरूप माहिती देण्याचे कौशल्य अगदीच सोपे आहे. परंतु माहिती दिल्यानंतर शेवटी भावनेच्या भरात मुलांना अपमानित करणारे शब्द टाळणे कठीण आहे. उदा. “मळलेले कपडे टाकण्यासाठी धुण्याची बादली असते. तू हे कधी शिकणार आहेस? ” आपण पालक म्हणून बोलताना हा भावनेचा भर जाणीवपूर्वकपणे थांबवायला शिकले पाहिजे.
“बागेत खेळून तू तुझा गणवेश खराब करशील किंवा फाडशील.”
असं बोलण्याऐवजी
“गणवेश शाळेसाठी आहे, स्लँक कपडे बागेत खेळण्यासाठी आहेत.”
असे बोलल्यास मुले आज्ञापालन करतात.
“नावे ठेवू नको, चिडवू नको, मूर्खासारखे वागू नको,”
असे म्हणणे टाळून
“नावे ठेवून चिडवल्याने भावना दुखावल्या जाऊ शकतात.”
असे बोलल्याने ऐकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमभाव तयार होतो.
आपल्या मुलांनादेखील एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणे आवडते. पालक आपल्या क्षमतांवर विश्वास दाखवतात याचा त्यांना अनुभव येतो. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे आपल्याला दिसते. वडीलधारी मंडळी आपल्याकडे जबाबदारी सोपवतात याचा परीणाम म्हणून मुलांचा आत्मगौरव व स्व:आदर वाढीस लागतो.