आपल्या निवडी व निर्णय जर आपल्या स्वप्नांशी व आकांक्षांशी विसंगत असतील तर, स्वतःच्या मनाला रिस्टार्ट व रिबूट करण्याची गरज आहे.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
रसपूर्ण:
आयुष्य रसपूर्ण व चवदार बनवायचे असेल तर, आपल्याला सर्वच प्रकारच्या भावभावना, योग्य प्रमाणात अनुभवायला शिकायला हवे.
दुर्लक्ष:
आपल्या इच्छाआकांक्षा व स्वप्ने आपल्याला भावनांच्या माध्यमातूनच कळतात, त्यांकडे दुर्लक्ष म्हणजे उज्वल भविष्याकडे पाठ.
नकार:
जर आपण नकारात्मक भावनांना नकार द्यायला व लपवायला शिकलो तर, आपल्या सकारात्मक भावनांनाही आपण तसेच वागवू शकतो.
ताणतणाव:
जेव्हा आपल्याला “बिलकूल वेळ पुरत नाही,” असे वाटून ताणतणाव जाणवतो तेव्हा, आपण ध्यानधारणा सुरू करायला हवी.
ध्यानधारणा:
आपल्याला जे काही मिळते त्याबद्दल आनंद, समाधान व क्रुतज्ञता वाटत नसेल, तर आपण ध्यानधारणा करायला शिकूयात.
ध्यानधारणा:
आयुष्यातील जबाबदाऱ्यांचे व स्वतःसह सर्वांच्या अपेक्षांचे, आपल्याला सतत ओझे वाटत असल्यास, ध्यानधारणा सुरू करूयात.
मौजमजा व दंगा:
जवळच्या नात्यांमध्ये दोषारोप, टीकाटिप्पणी व जीवन गंभीर व साचलेले असेल तर; मैत्री, मौजमजा व दंगा फायद्याचा, न आवडला तरी.
शंकाकुशंका:
आपली पात्रता, लायकी, क्षमता व शक्ती यांबद्दल आपल्याला वाटणाऱ्या शंकाकुशंका, आपण आपल्या पालकांकडून उचलून घेतो.
वाढवूया:
आयुष्यातील अडचणींच्या काळात, आपल्याला ‘खोल गर्तेत गेल्यासारखे,’ वाटणे, बालपणाच्या प्रेमाच्या कमतरतेमुळे असू शकते, ते वाढवूया.