ज्या गोष्टींचा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच गोष्टी उघडकीस येत जातात किंवा आपल्याला सापडत जातात.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
वचने व स्वप्ने:
भावनेच्या भरात स्वतःला व इतरांना दिलेली शाब्दिक वचने व स्वप्ने, आपल्याला आपल्या भावनांना दाबून-दडपून ठेवायला भाग पाडतात.
निसर्गाचं सान्निध्य:
आपल्या मनातील कोलाहल व भावनिक वादळ शांत करायला, निसर्गाचं सान्निध्य हा एक प्रभावी उपाय आहे, तो वापरूया.
गफलतींना मौल्यवान:
आपल्या गफलतींना मौल्यवान बनवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्यांमधून आपली ध्येयं व मूल्यं यांबद्दल काहीतरी शिकणे.
मदत:
जवळच्या व्यक्ती आपल्याला मदत करू शकत नाहीत, जर आपण आपल्या अत्रुप्त नकारात्मक भावना त्यांच्यावर थोपवायला लागलो.
अस्वस्थ:
ज्या कारणामुळे आपण अस्वस्थ आहोत असे आपल्याला वाटते, ते कारण असण्याची शक्यता फक्त दहा टक्के असते, ईतर कारणे शोधायला शिकूया.
वैयक्तिक पातळीवर:
गतकाळातील अनिर्णित भावना मनात आल्यावर, आपण हळवे होतो व इतरांच्या प्रतिक्रिया, टीका, नकार, दूषणे यांना वैयक्तिक पातळीवर घेतो.
दुखऱ्या भावना:
आनंदी व प्रेमळपणे रहावे अशी स्थिती असताना, जर आपण दुःखी व घाबरलेले असू, तर या आपल्या वर्षानुवर्षे दाबलेल्या दुखऱ्या भावना असतात.
इच्छा व गरजा:
ज्या नात्यामध्ये आपापल्या इच्छा व गरजा बोलण्याची, सहकार्य मागण्याची व नाही म्हणण्याची मुभा असेल, ते सुदृढ समजूया.
आधार व सहकार्य:
आपल्याला हवासा आधार व सहकार्य मागायला शिकले पाहिजे, कारण अंतःप्रेरणेने खूपच थोड्या नातेवाईकांना, हे न सांगता समजते.