आपल्या भडकलेल्या भावनांचे कारण बाह्यजगातील घटना नसते, तर आपल्या अंतर्मनाने त्या घटनेचे केलेले मूल्यमापन असते.
Category: Uncategorized
अर्थ:
आपल्या जीवनातील घटनांचा आपण जो अर्थ लावतो, तो विवेकी असेल तर जीवनाला अर्थ मिळतो, नसेल तर अर्थातच अनर्थ.
सोडून:
विकास किंवा विकासकामातील प्रयत्न सोडून देण्याऐवजी आपण राग, लोभ, मोह, मत्सर, द्वेष इत्यादी सोडून द्यायला शिकूयात.
प्रयत्नशील:
जोपर्यंत आपण स्वतःमध्ये सुधारणा व विकास करण्यासाठी प्रयत्नशील असतो, तोपर्यंत आपण यशस्वी व विजयी असतो.
माहिती:
अनिश्चितता व गोंधळ कमी करून, त्यातल्या त्यात बरे मार्ग शोधण्याचा, सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याविषयीची माहिती मिळवत राहणे.
जुने:
गोंधळलेल्या व घाबरलेल्या मनस्थितीत आपल्याकडून जुने व कमी प्रभावी मार्ग निवडले जाण्याची शक्यता जास्त असते.
जोड:
ज्या गोष्टींमध्ये बदल अटळ असतो, त्या गोष्टींमधील आपली स्वतःची भावनिक ओढ व जोड आपण कमी करायला शिकूया.
इच्छाआकांक्षा:
आपल्या इच्छाआकांक्षा जगाने पूर्ण कराव्यात अशी आशा करणे व त्या पूर्ण न केल्याने जगाला दोष देणे, म्हणजे दुःख व निराशा.
अखंडता:
अंतरात्मा, मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर या सर्वांचे चलनवलन आपल्या मूल्यांशी व ध्येयांशी सुसंगत ठेवणे म्हणजे अखंडता.
स्वःनियंत्रण:
स्वतःमधील विनाशकारी भावना, आवेग व उर्मी यांना स्वतःहून आवर घालता येणे व त्यांवर काबू करणे म्हणजे स्वःनियंत्रण.