चुका पोटात घातल्यास माफीमध्ये रूपांतरीत होतात, चुका डोक्यात घातल्यास रागामध्ये रूपांतरीत होतात.
चांगलं:
“चांगलं वागून व बोलूनसुद्धा पाहीलं,” यातलं पाहणं वरवरचं असतं, मनापासून नसतं, म्हणून नेहमीच चांगलं वागू व बोलू हळूहळू ते मनापासून येईल.
पळवाटा:
आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल तर ते मान्य करणे, दिलगिरी व्यक्त करणे व माहीत करून घेण्यासाठी निश्चित कृती करणे, हाच उत्तम मार्ग; बाकी सर्व पळवाटा.
आनंद:
आनंद पसरवणाऱ्या, वाटणाऱ्या आणि देणाऱ्या कृती व उक्ती सुरू करणे आणि सतत करतच राहणे हा आनंदी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
मुक्ती:
आपल्या आसक्ती व भिती आपल्याला काहीतरी क्रुती करायला भाग पाडतात, आनंद देतात त्या आसक्ती, दु:ख देतात त्या भिती व दोहोंपलिकडे मुक्ती.
विवेक:
आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येणे म्हणजे बुद्धीमत्ता,
आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचे महत्त्व लक्षात येणे म्हणजे शहाणपण
आणि हे दोन्हीही स्थळ-काळ-वेळ यानुसार कमी-अधिक महत्त्वाचे आहेत हे लक्षात येणे म्हणजे विवेक.
द्रुष्टीकोन:
इतरांच्या द्रुष्टीकोनातूनही गोष्टी पहायला व समजून घ्यायला शिकणे, म्हणजे आपल्या स्वतःच्या द्रुष्टीकोनाच्या कक्षा विशाल करणे.
हेतू:
आपली प्रत्येक कृती काहीतरी मिळवण्याच्या हेतूने केलेली असते, या सर्व हेतूंची जाणीव व ओळख करून घेणे, म्हणजे स्वत:चा शोध.
ग्राहक:
नातेसंबंधांमध्ये आपण ग्राहक असतो; गुणांचे किंवा अवगुणांचे, जे हवं असेल तेच बघूया, बोलूया व घेऊया, बाकीचं सगळं सोडून देऊया.
सत्ता:
ज्या गोष्टींवर आपली निरंकुश सत्ता चालू शकते, त्या सर्व गोष्टी आपल्या आतच असतात, त्या आपण तिथेच शोधल्या पाहिजेत.