○नियमित, योग्य मात्रेमध्ये, सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावीत.
○नियमितपणे डॉक्टरांना भेटून आजाराची व औषधांच्या मात्रा याची चर्चा करावी.
○औषधांबरोबर कौटुंबिक प्रेम, सामाजिक सहाय्य, व्यवसाय व नियमित वैयक्तिक दैनंदिनी यामुळे आजाराला लवकर उतार येतो.
○उपचारा संबंधी व आजारासंबंधी काहीही अपेक्षा, शंका व गैरसमज असल्यास मनमोकळे डॉक्टरांची बोलावे.
○ उपचारास नकार देण्याचा, दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
○ रुग्णाच्या, नातेवाईकांच्या किंवा इतर कोणाच्याही जीवाला, जीवनाला व जगण्याला आजारापासून काहीही भीती असल्यास स्पेशल दवाखान्यात भरती होणे कायद्याने बंधनकारक आहे.
○नियमित औषधांबरोबर ध्यानधारणा, व्यायाम व योगासने केल्याने जीवनमान व राहणीमान सुधारते.
○नियमित ताजा, चौरस व प्रथिनयुक्त आहार घ्यावा.
○ आहारामध्ये साखर, मैदा, रेडीमेड फास्ट फूड व बेकरी यांचे प्रमाण कमीतकमी ठेवावे.
○नियमित पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. रात्रपाळी व जागरण टाळावे.
○नियमित नातेवाईक व मित्रांशी आपल्या वैयक्तिक चिंता, काळजी व दैनंदिन गोष्टी याविषयी गप्पा माराव्या.
○नियमित आपल्या लहरी, मूड, दिवास्वप्न, विचार व भावना यावर लक्ष ठेवावे. अचानक व तीव्र बदल झाल्यास डॉक्टरांशी लगेच चर्चा करावी.
○निराशा, राग, भीती, धुंद व आजाराची लक्षणे तीव्र असताना असताना वाहन व मशिनरी चालवू नये.
○दारू, तंबाखू व इतर मादक द्रव्य कधीही, कुठेही, कुणासाठीही आणि काहीही कारणासाठी बिलकुल घेऊ नये.
○घरातील शस्त्रे व कीटकनाशके कुलूपबंद कपाटामध्ये सुरक्षित ठेवावीत.
○आत्महत्या व मरण यासंबंधी रुग्णाने काहीही बोलल्यास किंवा चर्चा केल्यास डॉक्टरांशी नक्की संपर्क साधावा.
○50% रुग्णांची औषधे काही काळानंतर व योग्य उपचारानंतर बंद होतात. उरलेल्या रुग्णांना कायमस्वरूपी, तहहयात औषधे घ्यावी लागतात.
○उशिरा रोगनिदान, उशिरा औषधोपचार व उपचार मध्येच बंद करणे यामुळे आजार उलटून कायमचे मानसिक, बौद्धिक, सामाजिक व प्रापंचिक अपंगत्व येते.
○ उपवर रूग्ण मुला मुलींचे लग्न करताना पाहुण्यांना आजार व उपचार यासंबंधी कल्पना दिल्यास व उपचार चालू ठेवण्यास संबंधी चर्चा केल्यास त्यांचे वैवाहिक जीवन सफल होऊ शकते.
○सर्व औषधांना काहीना काही साईड इफेक्ट असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध निवडण्यास मदत करू शकता.