“शंभर टक्के तयारी झाल्याशिवाय परिक्षा देणार नाही,” असे म्हणणारे कधीच परिक्षेला बसू शकणार नाहीत. “शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री झाल्याशिवाय प्रयत्न करणार नाही,” असे म्हणणारे कधीच प्रयत्न करणार नाहीत. “शंभर टक्के सुरक्षितता व निश्चितता यांची हमी मिळाल्याशिवाय करीअर निवडणार नाही,” असे म्हणणारे कधीच करिअर निवड करू शकत नाहीत.
पूर्वतयारी, काळजी व नियोजन चांगलेच असते; परंतु अतीपूर्वतयारी, अतीकाळजी व अतीनियोजन हेच आपल्या सुखी, समाधानी, यशस्वी, आनंदी व सम्रुद्ध जीवनातील अडथळे बनू नयेत याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे.